Tag: अर्धापूर

अर्धापूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ आरोपी ताब्यात, ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

अर्धापूरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४ आरोपी ताब्यात, ६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राइम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने अर्धापूर येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. दि. १८ एप्रिल रोजी अर्धापूर येथील उमर कॉलनी परिसरातील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच अनेक जुगारी पळून गेले, मात्र ४ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. आरोपीकडून ₹10,300 रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, १२ मोटारसायकली असा एकूण ₹6,60,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 207/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या धाडीत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. या कारव...
केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

केळी उत्पादकांना हेक्टरी ७४ हजारांचा पीकविमा मंजूर

शेती
शेतकऱ्यांचा लढा व आ. श्रीजया चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड|मुदखेड, बारड आणि अर्धापूर महसुली मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सोसाव्या लागलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा अखेर मंजूर झाला असून, या मंडळांसाठी उच्च व निम्न तापमानाची भरपाई म्हणून एकूण हेक्टरी ७४ हजार ६७८ रुपये भरपाई जाहीर करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे या तीनही मंडळातील सुमारे ४ हजार हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे सलग पाच दिवस प्रतिकूल तापमानामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र तापमानाची नोंद असूनही विमा कंपनीकडून तांत्रिक कारणास्तव शेतकऱ्यांचे दावे फेटाळले जात होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, या शेतकऱ्यांनी भोकर विधानसभा ...
अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्र्यांचे तातडीने कार्यवाहीचे आदेश

शेती
नांदेड| अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान सहन करणाऱ्या अर्धापूरमधील १०२ शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत रोजगार हमी योजना विभागाला कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी अतिवृष्टीमुळे खचल्या किंवा बुजल्या होत्या. शासनाच्या विशेष मदत पॅकेजअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज व पंचनामे पूर्ण केले होते. मात्र ‘मनरेगा’ योजना ग्रामीण भागापुरती मर्यादित असल्याने केवळ तांत्रिक कारणामुळे हे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. या अन्यायकारक परिस्थितीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लक्ष वेधले. “नुकसान समान असताना केवळ प्र...
नांदेडमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव

नांदेडमध्ये गांजा तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव

क्राइम
नांदेड | नांदेड जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गांजा तस्करीचे रॅकेट उधळून लावले आहे. नांदेड पोलीस (Nanded Police) यांच्या या धडक कारवाईत सुमारे ₹६,७५,५०० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २८ किलो १५० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे ₹२,२५,५०० इतकी असून, यासोबतच स्विफ्ट डिझायर कार ४, ५०, ००० असा एकूण ₹६,७५,५०० चा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी रवी बाबुराव वाघे (रा. भोक्कर) आणि एक अन्य आरोपी यांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (Avinash Kumar) यांच्या मार्...
error: Content is protected !!