Tag: संदेश

हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

हरवलेलं सोनं परत; प्रामाणिकपणाने जिंकली मने

सामाजिक
हिमायतनगर, अनिल मादसवार| आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण हिमायतनगर येथे पाहायला मिळाले. बोऱगडी येथील शेतकरी प्रभू शेणेवाड यांची हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत देत काही तरुणांनी माणुसकीचा आदर्श घालून दिला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शेतकरी प्रभू शेणेवाड यांनी हिमायतनगर येथील प्रतिष्ठित व्यापारी संदीप पळशीकर यांच्या अभिषेक ट्रेडिंग कंपनी येथे कापूस विक्रीसाठी नेला होता. त्या गडबडीत त्यांची 1 तोळा वजनाची सोन्याची अंगठी हरवली. बराच शोध घेतल्यानंतरही अंगठी सापडत नसल्याने त्यांनी ती हरवली असे गृहित धरले होते. दरम्यान, हिमायतनगर येथे वाहन भरताना रमेश बनसोडे यांच्यासोबत काम करणाऱ्या फकीरा सोळंके यांना ती अंगठी सापडली. कोणत्याही मोहाला बळी न पडता त्यांनी तत्काळ प्रामाणिकपणा दाखवत संबंधित शेतकऱ्याचा शोध घेत अंगठी परत केली. ...
राष्ट्रप्रेम घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून व्यक्त झाले पाहिजे – अनुजा डोईफोडे

राष्ट्रप्रेम घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून व्यक्त झाले पाहिजे – अनुजा डोईफोडे

सामाजिक
नांदेड (गोविंद मुंडकर) “सामाजिक सद्भावना ही केवळ संकल्पना नसून ती आचरणातून दिसली पाहिजे; जागतिक घडामोडींची जाणीव ठेवून सजग नागरिक बनणे आवश्यक आहे; जाती-धर्माच्या भेदांपलीकडे मानवतेचा स्वीकार करणे हीच खरी प्रगती आहे; समाजसेवा हीच खरी राष्ट्रसेवा असून राष्ट्रप्रेम घोषणांमध्ये नव्हे तर कृतीतून व्यक्त झाले पाहिजे,” असे प्रतिपादन ‘मानसी’ महिला पुरवणीच्या संपादक अनुजा डोईफोडे यांनी नवज्योत फाउंडेशनच्या संस्कार शिबिरात केले. संस्थापक नौनीहालसिंघ जागीरदार यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित जीवनाची दिशा देण्यात आली. आपल्या मार्गदर्शनात डोईफोडे यांनी इस्राईल-इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या जागतिक परिस्थितीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी व्यापक आणि सजग दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. स्थानिक पातळीवरील प्रश्नांबरोबरच जागतिक घडामोडींची जाणीव अ...
error: Content is protected !!