Tag: भीषण पाणीटंचाई

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना असूनही माळाकोळी, सावरगावात भीषण पाणीटंचाई

कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना असूनही माळाकोळी, सावरगावात भीषण पाणीटंचाई

सामाजिक
लोहा तालुक्यात 60 विहीर-बोअर अधिग्रहण प्रस्ताव; अनेक गावांमध्ये टंचाई निवारणासाठी प्रशासनाची धावपळ लोहा| कोट्यवधी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही लोहा तालुक्यातील माळाकोळी आणि सावरगाव नसरत या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माळाकोळी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे 32 कोटी रुपयांची जलयोजना सुरू असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तर सावरगाव नसरत येथे 23 कोटी रुपयांची योजना अर्धवट अवस्थेत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. माळाकोळी गावाला पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी पूर्वी ग्रामस्थांनी स्मशानभूमीत उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर योजना मंजूर झाली, उद्घाटनही झाले; मात्र गावात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यानंतर चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निगराणीत 32 कोटी रुपयांची नवीन योजना मंजूर करण्यात आली....
error: Content is protected !!