सरसमजवळील भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर संताप
प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागावर नागरिकांची नाराजी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे सरसम नजीक राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
“रस्ता रुंद झाला, पण अपघातांचे सत्र कधी थांबणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते, महामार्ग रुंदीकरणानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग वाढला असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना अद्याप अपुऱ्या आहेत. परिणामी, वारंवार अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.
सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी वेदना मांडत म्हटले आहे की, या रस...



