Tag: पुनरुज्जीवनाचे आदेश

आरोग्य यंत्रणेला नवा श्वास; सर्व आरोग्य समित्यांच्या पुनरुज्जीवनाचे आदेश

आरोग्य यंत्रणेला नवा श्वास; सर्व आरोग्य समित्यांच्या पुनरुज्जीवनाचे आदेश

आरोग्य
नांदेड| राज्यातील आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अधिक परिणामकारक सेवा मिळावी यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत कार्यरत असलेल्या सर्व आरोग्य समित्यांचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) तसेच ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) या समित्या नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेक ठिकाणी या समित्या निष्क्रिय झाल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागात VHNSC मार्फत स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यावर लक्ष दिले जाते, तर शहरी भागात MAS ही महिला-के...
error: Content is protected !!