
हिमायतनगर | तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री वामनराव मोरे ठाकुर महाराज यांच्या मातोश्री सारजाबाई रामचंद्र मोरे ठाकुर यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे, सुना व नातसुना असा मोठा परिवार आहे.


सारजाबाई या शांत, सोज्वळ व आपुलकीने वागणाऱ्या जुन्या पिढीतील आदर्श गृहिणी होत्या. साधी राहणी, नीटनेटकेपणा, डोक्यावर पदर आणि आदरयुक्त बोलणे ही त्यांची ओळख होती. कुणालाही दुखावू नये, हीच त्यांची जीवनशैली होती.


त्यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सरसम (बु.) येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
..भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏ॐ शांती 🌺


