रायलसीमा एक्सप्रेस परभणीपर्यंत वाढवण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर
नांदेड/हिंगोली| मराठवाड्यातील तिरुपती बालाजी भक्तांसाठी थेट आणि सोयीस्कर रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील भाविकांना तिरुपतीला जाण्यासाठी थेट रेल्वे पर्याय अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवास करताना अनेकदा बदल करावे लागतात, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात. विशेषतः वयोवृद्ध आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भक्तांसाठी ही बाब अधिक त्रासदायक ठरत आहे.
दरवर्षी हजारो भाविक तिरुपतीला दर्शनासाठी जात असल्याने, या भागातून थेट रेल्वे सेवा सुरू होणे ही दीर्घकालीन गरज बनली आहे. रायलसीमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार झाल्यास प्रवाशांना अधिक सु...
